बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

राज्यातील सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याबाबत व सखी-सावित्री समिती गठित करण्याबाबत निर्गमित केलेल्या शासन परिपत्रकांच्या अंमलबजावणीबाबत...

दिनांक: २० ऑगस्ट, २००८


आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.


राज्यातील सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याबाबत व सखी-सावित्री समिती गठित करण्याबाबत निर्गमित केलेल्या शासन परिपत्रकांच्या अंमलबजावणीबाबत...


संदर्भ :-


१) शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-१११७/प्र.क्र.८०/एस.एम.१. दिनांक ०५ मे, २०१७.


२) शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.३९/ एसडी-४, दिनांक १० मार्च, २०२२.


३) शासनाचे समक्रमांकाचे पत्र, दिनांक ०३ नोव्हेंचर, २०२३.


महोदय,


राज्यानीन्न शाळांमध्ये विद्यार्थी / विद्यार्थीनोंच्या सुरक्षिततेवावत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग माणून गज्यानीन्न शाळांमध्ये "तक्रारपेटी" बसविण्याबाबत संदर्भ क्र. १ येथील दिनांक ०५ मे, २०१७ च्या शासन परिपत्रकान्यय निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलोच्या मुर्गक्षननमाठी व निकोप आणि समनामुलक वातावरण निर्मितीसाठी संदर्भ क्र. २ येथील दिनांक १० मार्च, २०२२ च्या शासन परिपत्रकान्वये विविध स्तरावर "सखी सावित्री" समित्या गठित करण्यात आलेल्या आहेत. गज्यानीन्न सवं माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये संदर्भाधीन क्र. १ व २ येथील शासन परिपत्रकानुसार चारण्यात आलेल्या कार्यवाहीयावतची सद्यस्थिती शासनास तात्काळ सादर करण्यात यावो. नमच ज्या शाळामध्थ्य सदर परिपत्रकांनुसार कार्यवाही करण्यात आलेली नसेल, त्या शाळांमध्ये पुढोल आउ दिवसान कार्यवाही करण्याचे निर्देश आपन्यास्तरावरून संबंधितांना देण्यात यावेत. विहित मुदतीनंतरहो संदभांधीन शासन परिपत्रकांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणान्या संबंधितांवर यथायोग्य कारवाई करण्यान यावी, ही विनंती.


आपला,


Nulkan


(अ.अ. कुलकर्णी)


अवर सचिव, महाराष्ट्र शासन



सखी सावित्री मंच स्थापन करणेबाबतचा शासन निर्णय

 राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर 'सखी सावित्री' समिती गठन करणेबाबत...

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक-संकीर्ण-२०२२/प्र.क्र.३९/एसडी-४, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक :- १०.०३.२०२२

प्रास्ताविक :

बालकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे याकरिता संयुक्त राष्ट्र संघाने सन १९८९ मध्ये बालहक्कांसंदर्भात बालहक्क संहिता स्वीकारली असून त्याद्वारे सर्व बालकांना मूलभूत मानवी हक्क मिळविण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. जसे जीविताचा अधिकार, शारीरिक आणि बौद्धिक सुप्त गुणांचा विकास करण्याचा अधिकार, बालकांच्या विकासावर घातक परिणाम होईल अशा प्रभावापासून संरक्षणाचा अधिकार तसेच कौटुंबिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात सहभागी होण्याचा अधिकार. बालकांचे हक्क हे विशेष मानवी हक्क आहेत, जे १८ वर्षांखालील सर्व मुला-मुलींना लागू आहेत. जात, धर्म, वंश, लिंग, रंग, भाषा आणि संपत्ती इत्यादींचा विचार न करता सर्व बालकांना हक्क मिळवून देणे हे बालहक्क संहितेनुसार क्रमप्राप्त आहे. महाराष्ट्रात बालकांच्या हक्कांचे संरक्षण, प्रचलन आणि रक्षण करण्यासाठी बालहक्क संरक्षण कायदा २००५ अन्वये जुलै २००७ मध्ये महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. तथापि बालहक्क आयोगाच्या स्थापनेपूर्वीपासून महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक थोर समाजसुधारकांच्या पुरोगामी विचारांचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. थोर समाज सुधारक आणि श्री शिक्षणाच्या अग्रणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात बालहक्काचे महत्त्व ओळखून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. तसेच बालविवाह, सती, केशवपन अशा अनेक अनिष्ठ रूढी परंपरांविरुद्ध त्यांनी बंड पुकारले.

बालहक्क संरक्षण कायदयानुसार सर्वच बालकांच्या हिताचे / हक्कांचे रक्षण करणे अभिप्रेत आहे. सदयस्थितीत मुर्तीचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज जाणवत आहे. कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर मुला-मुलींच्या शिक्षणावर दूरगामी परिणाम झालेले दिसत आहेत. पालकांच्या स्थलांतरामुळे शाळाबाहय मुला-मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. तसेच बालविवाहांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. घर, शाळा आणि समाजात मुला-मुलींना सुरक्षित व बालस्नेही वातावरण मिळावे, तसेच त्यांचे सामाजिक, भावनिक, अध्ययन उत्तमरित्या व्हावे यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२५ व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विविध स्तरावर समित्या गठित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन परिपत्रक क्रमांका संकीर्ण-२०२२/प्र.क्र.३१/एसडी-४,

शासन परिपत्रक -

राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुर्लीच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावरून विविध स्तरावर 'सखी सावित्री' समितीचे गठन करण्यात येत आहे.

शाळास्तर "सखी सावित्री" समिती :



१.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष-अध्यक्ष

२.शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी-सदस्य

3.समुपदेशक-सदस्य

४.वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ (महिला प्रतिनिधी)-सदस्य

५.अंगणवाडी सेविका-सदस्य

६.पोलीस पाटील-सदस्य

७.ग्रामपंचायत सदस्य (महिला प्रतिनिधी)-सदस्य

८.पालक (महिला प्रतिनिधी)-सदस्य

९.शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी (२ विद्यार्थीनी व २ विद्यार्थी)-सदस्य

१०,शाळेचे मुख्याध्यापक-सदस्य सचिव

शाळास्तर "सखी सावित्री समितीची कार्ये :-

१) आपल्या कार्यक्षेत्रातील १००% मुला-मुलींची (दिव्यांग विद्यार्थी) पटनोंदणी व १०० टक्के उपस्थिती साध्य करण्यासाठी गावातील प्रत्येक घरी शिक्षकांनी / बालरक्षकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची नावनोंदणी करणे.

२) स्थलांतरीत पालकांच्या व शाळाबाहेर असलेल्या सर्व मुला-मुलींना सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करणे.

३) विद्यार्थ्यांच्या भावनिक, शारीरिक व बौध्दिक विकासासाठी तसेच ताणतणाव मुक्तीसाठी मुला मुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे, सजग पालकत्वासाठी कार्यशाळा आयोजित करणे.

४) मुला-मुलींच्या शिक्षणासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देऊन प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यवाही करणे.

५) मुला-मुलींना करिअर संबंधी मार्गदर्शन करणे, कौशल्य विकसनासाठी विविध उपक्रम राबविणे,

मुर्लीच्या स्व-संरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.

६) मुला मुलींसोबत आरोग्यदायी सवयीसाठी संवाद साधणे आणि निरोगी जीवनासाठी स्थानिक डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर, समुपदेशन यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करणे.


७) आपल्या कार्यक्षेत्रातील बालविवाह रोखून, बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम व बालविवाहाविषयी विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये जनजागृती निर्माण करणे व मुलींचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रयत्न करणे,

८) व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (CSR) च्या माध्यमातून सामाजिक, भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे.

९) विविध कारणांमुळे मुला-मुलींचा होणारा अध्ययन हास कमी करण्यासाठी उपाययोजना करणे. १०) शाळेत समतामुलक वातावरण राहील यासाठी लिंगभेदविरहित व समावेशक उपक्रम राबवणे, विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत अशी निकोप वातावरण निर्मिती

करणे, अपवादात्मक परिस्थितीत असे घडल्यास तक्रार दाखल करण्याबाबत लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत असलेल्या "ई-बॉक्स" या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधेबाबतची माहिती तसेच महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या "CHIRAG" या अॅपची माहिती व चाइल्ड हेल्पलाइन नंबर (१०९८) बाबत सूचना

फलक शाळेत लावले जातील याची खात्री करणे.

११) समितीच्या महिन्यातून १ वेळा (आवश्यकता भासल्यास अधिक वेळा) बैठका आयोजित कराव्यात. सदर बैठका शाळेत घेण्यात याव्यात, जेणे करून मुलामुलींचे प्रतीनिधी उपस्थित राहू शकतील. 

१२) शाळास्तर समिती बैठकाचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत केंद्रस्तर समितीसमोर सादर करावा. केंद्रातील कोणत्याही स्तरावर मुलींच्या शिक्षणाबाबत व इतर समस्याबाबत निर्माण झालेल्या अडचणी केंद्रस्तर समितीमध्ये समजू शकतील व त्यावर तातडीने निर्णय घेणे शक्य होईल. 

१३) सदर समित्यांचे फलक शाळेच्या/कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावेत.




सखी सावित्री मंच स्थापन करण्याबाबतचा संपूर्ण शासन निर्णय GR download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Download


शाळेत तक्रार पेटी बसविणे बाबतचा संपूर्ण शासन निर्णय GR download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Download


शैक्षणिक अपडेट्स नियमित मिळवण्यासाठी गुगल सर्च करा Eduupdatesms.Blog


ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद...


Visit Again 🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या सर्व वस्तुंऐवजी थेट रक्कम त्यांच्या बैंक खात्यात जमा करणेसाठी Pilots घेणेबाबत.

 शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या सर्व वस्तुंऐवजी थेट रक्कम त्यांच्या बैंक खात्यात जमा करणेसाठी Pilots घेणेबाबत. महा...